चला बोलूयात..

  • Facebook
  • Instagram

थंडी पांघरून शांत बसलेलं आपलं पुणे शहर
शहराच्या अंगा खांद्यावर उजवी कडून डावी कडून सुसाट धावणाऱ्या गाड्या , हायवेला असलेले छोटे छोटे रस्ते आणि त्यांना लागून असलेलं आपलं बाणेर
वेळ संध्याकाळची आयटी पब्लिक घरी परतण्याची , बाणेर पाषाण लिंक रोड , रोड वर असलेले छोटे चौक तुफान ट्रॅफिक....

पुण्याला काही नवीन नसलेली परिस्थिती बाणेरच काय सर्व साधारणपणे  सगळीकडेच बघायला मिळते

यू टर्नला परमिशन  नसतानाही नियमाला धाब्यावर बसवनारे
अश्याच चौकात आपलं पुन्हा बारसं करून घेण्यास इच्छुक असतात , नियम तोडून मध्येच भली मोठी गाडी वळवून खेळ-खंडोबा हा तेव्हा ही अनेकांनी केलाच, थंडी मूळ पसरलेलं धुकं आणि प्रदूषण , त्यात भर म्हणून कर्कश हॉर्नचे आवाज !
संध्या walk साठी आलेल्या काही मंडळींच्या चेहऱ्यावर हॉर्नचे आवाज उमटतले जात होते , वय वाढी मुळे त्यांना ते साहजिकच सहन होत नव्हते दोन्ही कानात बोटे घालून पायजमा घातलेले आजोबा त्रस्त मुद्रेने त्या रस्त्यावरून काढता पाय घेत होते .
कोपऱ्यात बघ्याची भूमिका मनोभावे पार पाडणारे रिक्षा स्टॅन्डवर असलेले रिक्षा वाले
त्याततून कोणीतरी बाहेर येतो आणि डावी कडे हात करून स्वयं सेवकांची जबाबदारी पार पडणारा एक मावळा बाहेर आला आणि डाव्या रस्त्यावरच्या चालकांना थांबण्याचा ईशारा केला पण काही दुचाकी वाल्यांनी तो इशारा धुडकावून आपल देश प्रेम असं कसं ते हि दाखवून दिलं , काहींनीं त्या रीक्षा चालकाचा इशारा स्वीकारून जागेवरच थांबून
यू टर्न घेणाऱ्या हिरोला मोकळा श्वास घेण्याचा एक चान्स दिला !

रेशमी धाग्यातील अडखळ ठरणारी गाठ सुटली आणि पुन्हा रस्त्या वरच्या दोन्ही बाजू धावू लागल्या.

पुन्हा एक हिरो सिगार असलेला उजवा हात महागड्या गाडीतून बाहेर दाखवत वळण्याचा इशारा करून पुन्हा सार्वजनिक बारश्यासाठी उपस्थित झाला....

चार पुरुषांच्या साक्षीने भर चौकात त्याचही बारसे झाले.....

--गौरव सु.सोनसळे
9766774462


डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने
गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट
उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत घातला , चिठ्ठी काढत त्याने आजू बाजूला नजर टाकली, जवळची खून राधा हॉटेलच होती त्याची खात्री करून घेतली , ती त्या दिवसाची त्याची शेवटची पिझ्झा delivery होती
रात्रीने थंडावा अंथरला होता ,भूकेलेले जीव दोन्ही बाजूला होते , फरक इतकाच की भूक कशाची कोणाला होती हि फक्त नियती बरोबर ज्याला त्यालाच ठाऊक होती , बिल्डिंग मध्ये प्रवेश करून लिफ्टच बटन त्याने दाबलं , "लिफ्ट" होण्यासाठी त्याला आज पर्यंत बरेच जिने आणि त्यांच्या पायऱ्यांवर पायघड्या होऊन पडावं लागलं होतं , लिफ्ट आल्या ची बेल वाजली , माजल्यावर जाण्यासाठी त्याने बटन दाबलं ,
लिफ्ट थांबली तो बाहेर आला , कंपनी च नाव त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेतलं , कंपनी मधले सर बाहेर आलेच होते , पिझ्झाची  payment process सुरु झाली . सुट्टे देणे घेणे ह्यात जरा वेळ गेला , जात असलेल्या वेळे नुसार हिकडंची तिकडची विचारपूरस सरांनी सहजच त्या डिलिव्हरी बॉयकडे केली

शिक्षण किती झालय रे तुझं ?
Enigineering झालाय असं तो म्हणाला
कॉलेज ?
त्याने ते हि सांगितलं

पिझ्झा मध्ये काम का करतोयस ? सरांनी विचारलं
त्या वर तो म्हणाला

ह्या जॉब मूळे मला बाणेर मधल्या IT companies कळतात .

इतकंच उत्तर त्याच होत !
उत्तर अनपेक्षित आणि वेगळं !
जरा बोलणं लांबल , मिळालेला पिझ्झा आत development room मध्ये दरवळत होता , त्यावर ताव मारणारे डेव्हलपर्स अनभिज्ञ होते

खरं तर दरवळ बाहेर सुटलेला , त्याचा वास हा फक्त आणि फक्त भविष्याला आला असावा

सरांनी engineering प्रोजेक्ट बद्दल विचारलं
त्याने तेही उत्तर दिलं
मग प्रोजेक्ट details मध्ये विचारला
लावलेलं हार्डवेर वैगेरे वैगेरे
हे सगळं सहज होत बर का !

प्रोजेक्ट मध्ये मोटार कोणती वापरलेली तीच का वापरली ?  ही वापरली तर काय झालं असत ती वापरली असती तर काय झालं असत असे एक एक प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उत्तरे देखील .
पिझ्झा संपलेला आणि बाहेरील चर्चा देखील
ही त्याची त्या दिवसाची शेवटची डिलिव्हरी होती , त्यानंतर तो घरी जाणार होता !
सर सगळ्यात शेवटी म्हणाले
"ठीक आहे , उद्या सगळे डोकमेंट्स घेऊन ऑफिसला ये !"

उभ्या उभ्या सुरु असलेली अशी ही चर्चा थांबली , चालेल सर म्हणून तो निघाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिस मध्ये हजर !
आता उभी नव्हती आता बसून चर्चा होती
ती देखील झाली , कोणीतरी बाहेर येऊन कालच्या सरांच्या केबिन कडे जाऊन सरांना फक्त "DONE" म्हणून सांगितलं.
HR ने थोडा वेळ wait करायला सांगून त्याला नंतर आत बोलावलं आणि सर HR आणि "तो" आमने-सामने ! मालिका त्याने जिंकलेली मॅन ऑफ दी मॅच , मॅन ऑफ दी सिरीज देखील तोच .....
काल पिझ्झा घेण्यासाठी सरसावल्या हातात आज देण्यासाठी ऑफर लेटर होत , थक्क करणारा प्रसंग आणि रात्रीत पालटलेलं नशीब........

--गौरव सु.सोनसळे
-9766774462


 ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ 

भाग 1 

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ 


आत्ता आत्ता  मागच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्री क्षेत्र तुळजापुरी समस्त कुटुंबियां बरोबर जाण्याचा महायोग आला! 
टूर निघाली दूर निघाली अस म्हणत पहाटे 5 ला पुण्याची वेस ओलांडली , अक्कलकोट-तुळजापूर देव दर्शनासाठी....... 
तुळजाईच ठाणं आलं ! 
आम्ही तिघेच रात्री दर्शनाला मंदिराकडे निघालो 
जगदंबेच रात्रीच दर्शन घेऊन सकाळी प्रस्थान करण्याचा आमचा विचारी मानस आम्हा तिघांनाच सुरुवातीला पटणारा होता, पण वेळेने तो सगळ्यांना पटण्यास भाग पडला .....
थकल्या अंगाने आम्ही तिघेच दर्शाना साठी रात्री मंदिर सदरेवर आलो , गार जोंबत्या वा-र्यास आवाहन देऊन भर रात्री १२ च्या सुमारास आम्ही तिघांनी मंदिरा बाहेर ठाण टाकला , मंदिर उघडण्यास तसा बराचसा वेळ असल्याने अनुभवी गप्पा  ऐन थंडी वा-र्यात रंगल्या , देशपातळीवरचे किस्से हकीकती आणि ऐकीव कहाण्या ह्याने चर्चा आणि विचार ढवळून  निघाले होते ,
तेवढ्या  कुठून कुणास ठाऊक  कंबरेत वाकलेल्या,काळ्या लोंबत्या कातडीच्या पांढरे शुभ्र केस झालेल्या ९० ल्या एक आजी समोर येउन उभ्या राहिल्या, हिरवी साडी आणि मायाळू  स्वर ही त्यांच्या श्रीमंतीची ओळख , त्यांच्या  बोलण्यान ममतेच त्याचं स्त्री रूप ओसांडून वाहत होत  ,त्या ममता भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी नजर आमच्यावर धरली आणि थकल्या जबानीन मातृ अजावत त्या म्हणल्या 
" काल आलॆऎ र तुळजापुरात,अजून दोन दिस हाय, दर्शन करणार अन मग जाणार्र ...... 
आम्ही काही न विचारताच त्यांनी सांगतलेल..
बसा बसा ! जेवलात का आज्जी? अस विचारल्यानंतर आपली ऐन वाधाक्यातली  कष्ट्लेली हायती भर झिजवलेला देह त्यांनी आधार घेत दगडी बैठकीवर अलगद ठेवला ते ठेवत असताना डाव्या हातातली काठीला ही आडवी टेकवली , जेवणाच्या आमच्या सवालाला त्यांनी नुसतीच मान हलवली 
दर्शनासाठी आतुरलेल्या भोळ्या भक्तांना गाभार्यातून तुळजाई बाहेर यावी आणि दर्शन द्यावं असाच काहीस होत  ते......... 
एकदम शांत आणि सात्विक...

आजी कुठून आल्या कोणालाच कळाल नव्हत, आमची रंगलेली परंतु मध्येच भंगलेली चर्चा पुन्हा सुरु केली,
शहाजी राजे प्रवेश द्वारा समोर असलेल्या तुळजाई वस्तूंच्या विकागीरांनी लावलेल्या मंद प्रकाशात सदर परिसर मंदावल्या प्रकाशाने उजळून गेला होता, प्रकाश मंद किणकिणता असला तरी त्यात तसुभारही अंधार नव्हता !  माथ्यवर उंच डोळे उघडून सदैव लुकलुकणारे तारे त्या प्रकाशात भर घालत होते ,

मंदिर उघडण्याची वेळ समीप आली होती , कुटुंबियांचा फोन आला आणि रात्री दर्शानाच्या सुमुहूर्तावर शिक्कामोर्तब झालं....
सह्यगिरीच्या ह्या विशाल पर्वत रंगांनी तुळजाईच्या पदरात युगानयुगे ठाव घेतला असावा म्हणून तर इथला  प्रत्येक पर्वत इतका  देखणं आणि राकट...........
मंदिरा समोरील छोटेखानी अंगणात असलेल ,उंच असलेल शहाजी राजे प्रवेश व्दार प्रत्येने नकळत न्याहाळल , भव्य उंच , देखन आहे तितकाच आबदार हे प्रवेशव्दार जगतजननीच्या अस्तित्वाला शोभेल असच होत , मंदिरात प्रवेश  करताना महाव्दारा समोरील कासवाच्या मस्तकाला झुकून हात लावला आणि आपल्या इमानी मनाला कधी तरी अचानक उठणाऱ्या अहंभावी विषाला आत आत खोल वर दाबल !
आतल्या मंदिरातील घूमटेचा सात्विक गाभारा भरून टाकणारा टोल दिला !
टन$$$ आवाजाच्या घूमटेने वातावरणातील पावित्र्य वाढवत नेलं...

सिंहासनी रणमर्दिनी जगदंबा रणदेवता ! सिंहाच्या पाठीवर आरूढ झालेली, शास्त्र संभार उगारलेली आरक्त नेत्रांच,रणदेवता आई तुळजा भवानी, तीच हे विराज स्थान...

"श्री ग ह खरे" यांनी शोधलेला काटी शिलालेख हा सर्वात प्राचीन पुरवा आहे असे मानले जाते , 25 नोव्हेंबर  1398 चा हा शिलालेख तुळजापुरच्या नैऋत्येस 20 किलोमीटर वर आहे , मारुती मंदिराच्या पाठीस असलेला लेखात परसरामजी गोसावी यांनी तुळजामातेच्या यात्रेला आल्या वेळी केलेल्या दानांची नोंद आहे.

भवानी मंदिरात तीन तीर्थ आहेत  कल्लोळ तीर्थ ,गोमुखतीर्थ , सुधाकुंड किंवा अमृतकुंड .
शहाजी राजे महाव्दारातून आत गेल्यावर कल्लोळतीर्थ लागलं 
देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची  निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे  या तिर्थास धावून आले आणि त्यांचा एकच कल्लोळ झाला.यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात अस वाचल होत .

स्नान कल्लोळ तीर्थाठायी।दर्शन घेई देवीचे॥ 
घेता चरण तीर्थोदय।होय जन्माचे सार्थक॥

या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते.
त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो
थोड पुढ गेल कि अमृतकुंड लागत, त्याच्या
अलीकडे गणेश मंदिर आहे येथे श्री सिद्धीविनायक देवता आहेत.थोड्या पाय-र्या उतरून गेलो तर सरदार  निंबाळकर दरवाजा लागला!आठराव्या शतकात करमाळयाचे रावरंभा निंबाळकर यांनी आतील सरदार निंबाळकर दरवाजा बांधल्याचा उल्लेख सापडतो तसेच बीडचे ठिगले सावकार यांनी शिखर बांधल्याचा उल्लेख आहे.निंबाळकर दरवाजा मध्ये रात्री १२.३० च्या वेळेसही सुरक्षितेसाठी भक्तांची झाडा झडती झाली , ते पाहून महाराजांच्या मुलखात तात्काळी सुलुख किती उत्तम राखला जात असेल असा विचार मनात येउन गेला,नव्वद पाय-र्या उतरून मंदिर परिसर येत , निंबाळकर दरवाजातून आत जाताच तुळजा भवानी मंदिरच उतुंग कलश नजर दृष्टीस पडला , चामकीदार , तेजस्वी वैभव संपन्न कलश पाहून मन प्रपुल्लीत झाल ,
महिषाचे रूप घेतलेला कुकर दैत्य त्यानी केलेला दैत्यी कारभार , अनुभूती वर टाकलेली वाकडी पापवासनी नजर ! हे सगळ ध्यानात घेऊन संकट तारिणी तुळजा भवानी देवीने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले. कर्दम ऋषीपत्नी अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळेतिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले अस सांगण्यात येत तेच हे तुळजापूर 
ह्याच तुळजापुराच्या ऐतिहासिक वैभव असलेल्या मंदिरात आमच कुटुंब प्रवेश कर्त झाल होत
निंबाळकर दरवाजा आला इवढ़या रात्री देखिल मंदिर सदरेत झडती झाली , ते पाहून महाराजांचा एक गुण आठवला "सदैव जागृत असणे !"
मंदिरात रात्री १२.३० नंतर ही  भवानी भक्तांची लांबच लांब दर्शनी रांग भरली होती , त्या रांगेत ऊभ राहून पुढ जात जात  भक्त आईचा गौरवी भंडारा खड्या आवाजात  उधळत होते ...  ते पाहून आम्ही देखील आईचा नारा दिला 
हे चंड मुंड भांडार सूर खंडीनी जगदंबे ,उदंड दंड म्हैशासुर मर्दिनी दुर्गे......!
सह्यस्वामिनी राजराजेश्वरी  आदिमाया महाशक्ती महाराष्ट्र स्वामिनी तुळजा भवानी माता कि  ..
"जय"  ह्या शब्दाचा उच्चार तेथे दर्शनास आतुरलेल्या प्रत्येक भवानी भक्त ने दिला  ! 
त्याचा आवाज मंदिर गाभा-र्यात बसलेल्या आई पर्यंत नक्कीच गेला असावा ! त्या भवानीच्या नांदी मूळ साऱ्यांच्याच चेहऱ्यावर प्रसंन्नी भाव आणि मनात भक्ती भाव भरून आला होता .
लांबच लांब ललका-र्या दिल्या नंतर रात्री १ च्या वक्तास आईचा गाभारा उघडला गेला ,रांग पुढ सरकायला लागली , हेमाड पंथी बांधकाम जवळ येताच मंदिराचे जुने खांब दर्शनास पडले ,तेव्हा पर्यंत अंगभर शहारा आणणारी थंडी ते दिसताच गायब झालेली जाणवली , हवेत वेगळीच ऊब आली , 16 खंबी सभा मंडपात जाताच !
उतू घातलेल्या दुध सारखा सर्वांचा भक्ती भाव उसंबळून आला ! 

इथेच "दैव तेज आणि क्षात्र तेज " कोणे एके काळी एकवटल होत.

ह्याच मंदिर सभा मंडपात महाराजां बरोबर दौड घेऊन आलेल्या मावळ्यांच भारदस्त, रांगडं व्यक्तिमत्व ह्याच खांबांनी जवळून पाहिलं असेल , देवीच्या  गाभा-र्यात महाराज आरतीला गेल्यावर आरतीची तबक दोन्ही हातांनी हातात घेण्यासाठी तासलेल्या बांबूच लांबच लांब भाला , टोकदार धारी पात्याचा भाला , आऊसाहेबांनी जगदंबेची ओटी भरण्यासाठी बरोबरी पाठवलेल खानी-नारळी तबक हातात घेण्यासाठी मावळ्यांनी , तो भाला क्षणभर ह्याच मंदिर खांबांना टेकवून ठेवला असेल, ह्याच दगडी खांबांनी त्या भाल्याच वजन जवळून पाहिलं असेल , गनिमांच्या छातीचा ठाव घेण्याआधी ह्याचतर खांबांनी त्याला आलिंगन दिल असेल  !
मावळ्यांच्या रनमर्दानी  मावळी पगडीवर ह्याच मंदिराने अनेकदा छत्र धरल होत ,पराक्रमी मावळ्यांच्या हातातील महाराजांनी स्वताहून घातलेलं हातकड ओळंबताना पाहिलं असेल 
कुलस्वामिनी च्या आरती नंतर मावळ्यांनी केलेला आईचा मर्दानाघोष ह्याच दगडी फरसबंदीनी सर्व प्रथम ऐकला असेल ! ह्याच दगडांनी सच्च्या मातृभक्तांच्या भक्तीचा ठाण आपल्या काळजाच्या भिंतीनवर आपणहूनच कोरून घेतला असेल ! 

माय जगदंबेचा जयकार चालला होता.
देवीच्या मंदिरातील भरलेल्या दाढीचीच्या , मोकळ्या केसांचा, खांदी उपरणं  घेतलेल्या भोप्याने 
व्हा बाजूला महाराज आले आले ! असा रिवाजी आवाज दिला , रांगेतील सर्वांना गाभारात जाण्या पासून काही काळ थांबवून ठेवलं !
त्या त्याच्या आवाजाने प्रभातकाळी सूर्य नारायणाच्या तेजाने सारा निसर्ग उजळून जावा तसा मंदिर सभामंडप " महाराज आले ! "  ह्या दोनच शब्द्तेजाने उजळून गेला !
माझ्या मनाने मनाच्याच डोळ्यांनी महाराजांना सभामंडपात उरभारलेल ऐचिक चित्र तुरंत रेखाटल !  जोतीबा , खंडोबा आणि महाराष्ट्रातील अश्या सर्वच  मंदिरात ह्या भोप्यांच्या अश्या  शब्दांचा प्रत्येय मी अनेकदा घेतलाय .... 
संगमरवरी भवानीच्या वाहनाची, सिंहाची,एक कलाविष्कारी मूर्ती सर्व प्रथम दर्शनास पडली.जबड़ा फाकवून उभा राहिलेला सिंह,देवी कडे सेवाभावाने पाहत उभा दोन पायांवर होता , मंदिरात जमलेल्या प्रत्येक भक्ताने  गुलाल टिळा त्याच्या माथ्यावर लावलेला ! लालेलाल कपाळाचा सिंह , प्रतिभाशाली संपन्नतेचा पाईक वाटला.
देवीचा  गाभारा  आला.. 
अनन्य भावाने , करुणा दृष्टीने पाहत असलेली दैवी अविष्कारी मूर्ती बोलत होती , गरज होती ती फक्त भक्ती भावाने ऐकण्याची !
ते तुळजाईच वैभवी चैतन्य साज सावली रूप डोळ्यांच्या महाव्दाराने सर्व जन निरखू लागले , डोळ्यात तेवत्या भाव निरांजानांनी समोर च्या दैव तेज न्याहाळताना समस्त सोनसळे कुटुंबाला वाटल आसव कि ह्या उभ्या हयातीत जगदंबेची ही  मुरत( मूर्ती )  क्षण भरही नजरेआड होऊ नये,हात जोडून आई च्या मातृवंत डोळ्यातील सात्विक भाव निरखला, कानात  प्राण आणून जगदंबा आपल्या भक्तांचा सल ऐकत होती .
ते रूप पाहून माझ मन भरून आल ,मनाला वाटल आत आत जाव अगदी आईच्या पायगतीवर  डोक ठेवून  आपल्या डोळ्यातील कृथार्थ भावांनी भरून आलेल्या मनानी अश्रुमोतीने धुऊन काढव , 
शक्य झाल असत तर तुळजाईने सर्व भक्तांना रात्रीच्या त्या वा-र्यात, आपल्या दैवी हातात सामावून घेतल असत , वीरत्वची  उज्वल परंपरा असलेले महाराज त्यांनी इथ आपल डोक ठवलेल,प्रत्येकची नजर अंतरी भक्ती भावाने भरली होती , भरून क्षण क्षण ज्ञात भक्तीचे कवाडे उघडत होते..... मिटल्या डोळ्यांनी , जोडल्या हातांनी सगळ्यांनी पाठीराख्या जगदंबेला आशीर्वाद मागितला ....

मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच "श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे.अष्टभुजा
महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला तेजोमय चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे."
ते मस्तक पाहून मनाला वाटत खानाला संपविल्या नंतर ह्याच तुळजाई भक्ताने जिजाईला पाठवलेल खानाच शीर हे अगदी असच....
देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषी पत्नी अनुभूती दिसून येते.श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे.
महिषासुराच्या धाडाच्या उजवीकडे सिंह हे भवानीचे वाहन आहे , त्याच्या खालच्या भागी मार्कडेय ऋषी आहे आणि डावीकडे भवानीने तारलेली , शिरावर शरीर तोललेली, तपोमग्न , सती अनुभूती आहे ....
देवी मूर्तीवर चक्राकार कुंडले,केयूर,अंगद,काकणे ,कंठा,माला,मेखला आणि साखळ्या कोरलेल्या आहेत 
ती चांदीच्या कमान बक्षीत तुळजाईची  मूरत ( मुर्त ) 
कैलासावरच्या महादेवाची अर्धांगिनी माता पार्वती सारखीच दिसत होती , तीच हि तुळजा भवानी, हीच ती मातापार्वती 
मिर्झाने कोटी चंडीला साकड घालूननही त्याचा त्याला काही फायदा नाही झाला, कोटी चंडीने शेवटी कोणाच्या तराजूत जुकात माप टाकल त्याचा करीना तमाम दुनिया जाणते , कौल लावलेले चंडीही हीच माता भवानी  !! 
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आमच्या आऊसाहेब सरंजामा सांगे जाऊन दुर्गदुर्गेश्वरीची ओटी भरून आल्या .....


उर्वरित भाग 2 मध्ये बोलूयात !


संदर्भ : श्रीतुळजाभवानी  ( कै.रामचंद्र चिंतामण ढेरे )
           श्री तुळजाभवानी पेन्टिंग- शेखर साने 
                                                                                                              -----गौरव सुर्यकांत.सोनसळे
                                                                                                                   9766774462


काळे ढग.... 


लांबलेल ऑफिसच timing संपल....
काळे ढग....
भरून आलेला पाऊस.......
आणि मी.......
जोराचा वाहता ठंड वारा
आठचा आकडा काट्यांनी मागे टाकलेला
लागलेली भूक... आणि चालता चालता पळावं लागलेली संध्याकाळ........
घरी निघालो , भरगच्च पॅग्गो मध्ये बसलो.........
जरा अंतर गेलं , काही जण उतरले, काही चढले !

पुढं जायचंय रे !!


असं आवाज ( हुकुमी)  खाड्कन कानावर पडला , ड्राइव्हर जेमतेम विशी मधला , त्याने हो साहेब बसा ना.......  राष्ट्रीयत्व दाखवणारा भाव त्याने दाखवला , ( दाखवणं गरजेचंच होत,पर्याय कुठं होता त्या समोर)
साहेब गाडीत बसले , Highway च्या road वर गाडी सुसाट धावायला लागली , वाऱ्याशी अन वेगाशी दोन हात करू लागली , उंच आस्मानी भिडलेल्या बिल्डींग्स बघून साहेब म्हंटले
काय रे !! केवढं त्या बिल्डींग्स....
एरवी मदतीला धावून न येणारे नागरिक , त्या साहेबांच्या शाब्दिक चेंडूला झेलायला पुढे धावले अन चर्चा सुरू झाली ......

सुरात सूर मिसळणे आपल्याला कधी जमलाय का ओ? 
गुरुर मध्ये गुरुर मिसळता आला म्हणजे स्वाभिमानी जगण्यात राम आला असं म्हणता येईल.
साहेबांच्या छातीवर आडनाव पाहण्यासाठी .......
मी  त्यांच्या छातीच्या उजव्या भात्यावर काळ्या नेम प्लेटवर नजर टाकली 
लाचारीच्या झुकलेल्या माने सारखी ती बोट भर आकाराची पाटी आडनाव तर सोडाच पण पाटीच तोंड दाखययला तयार नव्हती , जाडे  भरडे  हात विचाराच्या स्थितीत अन  भिरभिरती रूबाबी नजर!
आला चांदणी चौक आला 
काही प्रवासी त्यांनी 10 च्या  20 च्या नोटा ड्राइव्हर कड सुपूर्त केल्या आणि 
माझे देशबांधव यांच्याशी 
निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा  करीत आहे .
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी
यातच माझे सौख्य सामावले आहे,
ह्या कधी तरी लहानपणी घेतल्या गेल्या भारतीय प्रतिज्ञेचे अवलंबन त्या प्रवाश्यांनी केले असावे !
त्या प्रवाश्यां बरोबर साहेबही उतरले "येऊ का रे बाळा  ! " 
असं एक हुकुमी पण प्रश्नार्थक विचारची मांडणी केली त्या साहेबांनी केली !  बाळ तो शेवटी बाळच , त्याने होss होss.. म्हणत accelerator वर उजवा पाय दाबला  (त्याच्या मनातला बंडही )
गाडी पुढं गेली , उतरले ते मागे राहिले ते मागे राहिले...... 

"त्या "परंपरांचा" पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन"
वेगळी परंपरा आपल्या देशात रुजलेली त्याच्या अवलंबणं त्या driver ला करन तस पाहायला गेलं तर भागच होत 
प्रश्न " येऊ का "  इतका नव्हता , उद्या उगवणाऱ्या  सूर्य बरोबर Highway वर कष्ट करून भरणाऱ्या पोटाचा पण होता , धंदा बंद पाडला तर ........

तर काय  ? 
दुःख याचच आहे की रे माझ्या जाणता राज्या !
आम्ही वाट बघतो अन् म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या !


      --गौरव सुर्यकांत.सोनसळे ( पुणे ) ९७६६७७४४६२ 



संभाजीराजे
राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस.....
यांनी घडवलेली बखर चिटणीस बखर म्हणून नामवंत झाली
"चिटणीस बखर" ही बखर सुड बुद्धि ने लिहलेली , कल्पनाशक्तीचा विलाशी दंश केलेली आहे , शंभु राजांच्या मृत्यू नंतर 122 वर्षांनी लिहलेली बखर पुढील काळातील इतिहासकारांनी  संधर्भ सूची म्हणून "वापरली"
मल्हार रामराव चिटणीस हा बाळाजी आवजी यांचा वंशज , नितांत सुंदर लेखन शास्त्र , अक्षर , अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला हा बाळाजी आवजी राजापुरच्या ऐतिहासिक घटनेत महाराजांनी हेरला , दरबारी ठेवून घेतला  "लेखनप्रशस्ती" नावाचा  मराठी पत्र लेखनाचा ग्रंथ यांनीच लिहिला , महाराजांची अनेक पत्र दवतीतल्या शाहीने मयूर पंखाने कागदी रेखण्याच काम ह्यांचच !
शिवरायां नंतरच्या काळात शंभु राजांच्या जीवावर उठलेल्या काही नेत्यांमध्ये  बळाजी आवजी याचं नाव रोवल गेल आणि अनावधानाने रागाने शिवपुत्राने त्यांना हत्तीच्या पायी देण्याची  केलेली
" बळाजी आवजीस मारले ते बरे नाही केले , थोरल्या महाराजांचा त्यांवर जीव तो फार "
यावर शंभुराजानी केलेल्या चुकी बद्दल दिलगीरी देखील उत्तरी पत्रात व्यक्त केली आहे !
राजअज्ञा ! येसु बाई यांच्या एका पत्रात महारानी या बद्दल जाब खुल्या जबानींन  विचरतात त्या म्हणतात
जीवनातील काही सत्याच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचा भाष्य अपुर असत.....
जब तक "काफर का बच्चा संभा" हमारे हात नही लगता तबतक किमाँश नही पेहनूँगा....  अस म्हणनारा औरंग हां स्वतः किती मुसद्दी आणि चालाख होता ,
त्याला स्वतःच किमाँश  दूर करण्याची आनभाक घ्यावी लागली ती ज्यांमूळे ते संभाजी राजे किती तोडीचे अन ताकदीचे असतील हा विचार त्यांवर शिंतोडे उडवीणाऱ्यांना लक्षात आले नसेल का !
कोपिष्ट , शीघ्र संतापी आणि विलासी वाटलेले संभाजी राजे कसे होते हे त्यांच्या जगण्याने आणि मृत्यू ने जगाला दाखवून दिले आहे !
संभाजी राजांना आणि कवी कलश / कवी राज भुषण यांना सगळ्यात जास्त मलीन ठरवण्याच् काम मल्हार रामराव ने केल
शिवप्रभूंनी कधीही संभाजी राजांना पन्हाळ्यावर क़ैदेत ठेवल नव्हतं अस खरा इतिहास सांगतो ,
ब्लॉग वर ह्या बद्दल लिहण्याच कारण की मल्हार रावच्या मोघली चूका रियासतकारांनी जसेच्या तसे स्विकरल्या आणि नाटक लेखकांनी त्याकडे घडित इतिहास म्हणून बघितले अनेक नाटके लिहली गेली त्या इतिहासावर दुर्दैव................


नारळ पाणी 



संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला ..
 4/5 वर्षाचा नातू आणि त्याची आज्जी नारळ पाणी हाच फ्रेम मधला विषय ! एवढा मोठा हिरवा नारळ फोडनार कसा ? मुळात त्यात कस असत पाणी ? इथ पासून त्या नाताची विचारी शिकवणी सुरु झालेली , त्याचे ते गोबरे गाल नाराळातील मलाई सारखे , गोल डोळे बोलके पण सदैव प्रश्नार्थक ....
लाल टीशर्ट , ढब्या ढब्याची थ्रीफोर्थ  पायात साँडेल , सारखच डोक्याला हात लावून टाळूवर पडलेले स्पाइक्स ! आज्जी ची  डोळे मोठी करुण ऑडर होती की बसलेल्या खुर्ची ला हात लावयचा नाही , त्या वरही त्याला पडलेला प्रश्न ! वरुण फोडलेला नारळ स्ट्रॉ टाकून आज्जीच्या हातात आला ,
नारळ निवडण्या पासून हातात येई पर्यंत ह्याची प्रश्नार्थक नजर नाराळा वरुण काही हलायला तयार नव्हती , पडलेल्या प्रत्येक प्रश्ना वर अपोआपच बाहेर येणारा त्याचा हनुवटी वरचा ओठ !

हे सार जगत असताना मिळनारी आज्जीची शिकवण , पोरसवजा झालेल आजीच वय तरीही पोर होऊन जगलेली जगणारी आज्जी , एक मोठा घोट नारळ पाण्याचा स्ट्रॉने पिताना त्याला दम लागल्या सारख झाल , पाठ थोपटना-र्या
आज्जी हळू पी म्हणताना रूजवलेल गोंडलेल आयुष्याच सार ! खोब-र्याच्या मलाईचा मोठा घास तोड़ता येत नाही म्हणून मग थोडी थोडी खायला केलेली सुरुवात , आज्जी चा भरवता हात मागे सरकवत ,अर्धवट खाउन म्हंटलेल
"बस मला" , शेजारच्या भेळीच्या गाडीवर अंधरामूळ लावलेली रंगीबेरंगी लाइटिंग त्या मूळ ह्याला झालेला आनंद सगळ्यच निरागस !

                                                                                                            -----गौरव सुर्यकांत.सोनसळे




Back to school 



नववीचा वर्ग , भरलेल्या वर्गात  मराठी चा तास सुरु झालेला, वर्गातल्या out of coverage area असलेल्या काही जागांवर फूली-गोला गेम रंगात होता !

मराठीच्या मैडमची नजर चुकवून सुप्रसिद्ध पेन गेम वर्गातल्या पहिल्या आणि  चौथ्या row मध्ये अंदाजे सहाव्या , आठव्या बेंचवर जमला होता , रंगलेला खेल मध्येच भंगायचा आणि त्या खेळाच्या खेळाडूंना आपल्यातला खेळाडू लपवून गुपचूप गुणी  विद्यार्थ्याचा अभिनय अधून मधून करायला लागत असे ,  ईतक्यात मैडम ने कोणाला तरी उठवून काहीतरी विचारल , त्याला उत्तर काही येईना , इच्छा नसताना उभा केलेला उमेदवार पक्का पिचुन गेला होता , "मी तर लास्ट बेंच वरे ! अधले मधले किती तरी काय......."
 अस तो एकाएकी अर्धवटच म्हणाला , त्याची ती कुजबुज मैडम ला ऐकू गेली नाही  ,

 ज्यांना ऐकू गेली  ती पोर डांबरट पने हसली , झाल अजुन मैंडम चिडल्या !
"पकड़ा गया वो चोर" असल्याने बाकीच्यांना त्यांच्या खेळात व्यत्यय तसा फारसा येत नव्हता.
मधल्या सुट्टी नंतरचा तास असल्याने शाळेचे पर्यवेक्षक आणि इतर धास्ति वाटनारे शिक्षक शाळेचा राउंड मारत होते वर्गातून आम्हाला ते सगळ निटस दिसायच , चौकस नजर ना आमची !!


एकदम वर्गात CID टाइप इंट्री एका सरांनी घेतली , ते सर होतेच "दया" टाइपचे , आवाजही तसाच ..
आम्हाला वाटल वेगळ काही तरी असेल काम ! आपण आपले काम कराव ,
काही तरी मैडम बरोबर ते थोडा वेळ बोलले तो पर्यंत सगळी पोर रिलैक्स मूड मध्ये गेलेली , हावा ठंड होती , वातावरण नॉर्मल होत .
ईतक्यात घश्याच्या घाटीतून दमदार आवाज एक सवाल रिलैक्स वर्गा समोर टाकला गेला
कोण आहे रे तो ???? वर्गात क्रिकेटच्या बॉल ने खेलणारा कोने तो ?
कोणी काही बोलेना , शांतता इतकी की रिकाम्या वर्गात पण इतकी नसेल
आवाजा मूळ पेन गेम आणि फूली गोळाच सगल सामान एव्हना कंपास बॉक्स मध्ये हलक्या हाताने गुपचूप रुजू झालेल होत
तक्रारदाराला सरांनी उठावल आणि पुन्हा विचारल कोण होता तो ?

भाऊ ने घेतल प्रतिकच नाव आमच्या वर्गाचा CR , हां खरा उमेदवार होता त्या लेक्चर मधला , प्रश्ना वर प्रश्न सुरु झाले सरांचे , कोण कोण होत तुझ्या बरोबर ? अस विचारायच्या आधीच त्याने माझ्याकड ईमानी दोस्तीच "बोट" दाखवल , झाल मी दूसरा उमेदवार  ! मी मात्र कोणा बरोबर ईमानी दोस्ती तद्वत् दाखवली नाही , त्याने आणि मी दोघांनी दयावंत तोफ काही वेळ लढ़वली
आम्ही दोघांनी त्या वर्ग मित्राकड़ टक लावून बघितल ज्याने हा आमची तक्रार केलि होती  , बेडर लीडरची नजर त्याला काय डोळ्यात सामावून घेता आली नाही त्याने समोर सर असूनही मान टाकली आणि
बॉल जप्त झाला ..... 
                                                                                                             --गौरव सुर्यकांत.सोनसळे

  आनंद 





कोवळ्या सकाळची वेळ ...
नुकताच हिवाळी कात टाकून निसर्गाने उन्हाळी झळाळीची उधळन सुरु केलेली...

SNDT च्या स्टॉपवर  मी उभा होतो ,
अनेक जण माझ्या सारखेच बस आणि मित्रांची वाट बघत विचारात गुंग.....

मळकटलेली जीन्स उसवलेला टी शर्ट अस काहिसा वेश असलेला एक "आनंद" लांबूनच हसत हात वारे करत माझ्या दिशेने येत असताना दिसला ,परप्रांतीय पण कष्टप्रिय गुणा मूळ तो जवळ पासच कुठ तरी कामगार म्हणून असावा , त्याच्या त्या एकूणच वागण्यामूळ मी त्याचा इरादा नेमका हेरला , धपाधप पाऊल टाकत तो माझ्या जवळून पास झाला , माझ्या मागच्या अनोळखी मुलाला हा "आनंद" 

क्या भैया कैसा है ? इधर किधर ? 
अस म्हणाला ते पाहून तो "मुरारी लाल"
जरा नाही चांगलाच चरकला !

त्याला काय कराव काय कळाल नाही , तो लागला हिकड टिकड बघायला , आनंद बाबू सुकोपच्या चार गोष्टी विचारतच होता , तांतरलेला मुरारी  आलेल्या बस ने पटकन चढुन कल्टी पसार होऊ लागला , हसता हसता तो म्हणाला "चला भी ? बिना बात करे !"
हे सगळ बगताना मनाला वेगळीच मज्जा येत होती  , मुरारी ला त्याचा "आनंदी डाव" काही लक्षात आला नव्हता !
"आनंद बाबू" काही केल्याने त्याचा पिच्छा सोडायल तयार नव्हता ! शेवटी बस गेल्याने तोही हसत हसत निघाला !
आनंदला तेव्हा काही मुरारी लाल हवा तसा भेटला नाही कदाचित त्याचा "जयचंद " करणारा बाबू मोशाय नंतर कधी तरी भेटला असेल !
   
    ----गौरव सूर्यकांत सोनसळे
महात्मा , राष्ट्रपिता आणि गांधी

महात्मा
20 फेब्रु 2016 ला वर्तमान पत्रात एक लेख माझ्यावाचनात आला , गुरूजी रविंद्रनाथ टागोर यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा किताब ( बिरुदावली  ) दिलेला असा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने , राज्य सरकारला दिला
या निकाला कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते
'सहारनपुर संदर्भ' या पुस्तकानुसार "स्वामी श्रद्धानंदजी"  यांनी सर्वप्रथम गांधीजींना 'महात्मा' या नावाने संबोधल्याचे देखील वाचले आहे .
8 एप्रिल 1915 रोजी गांधीजी गुरूकुल कांगडी येथे संत महंतांच्या निरोप समारंभा साठी स्वामी श्रद्धानंद यांची भेट घेण्यासाठी गेले होते,  तेव्हा  गांधीजींच्या कार्याच गौरव करत श्रद्धानंद स्वामींनी त्यांना "महात्मा" या पदवीने गौरविले होते


राष्ट्रपिता
या पूर्वी कधीतरी भारत कोकीळा कवयित्री "सरोजिनी नायडू" यांनी महात्मा गांधींना उद्देशून "राष्ट्रपिता" ही बिरुदावली प्रथम वापरली, असा एक पुरावा प्रतिनिधीला सापडला होता असे माझ्या वाचनात आलेले ,भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी गांधीजींना राष्ट्रपिता ही बिरुदावली सगळ्यात पहिल्यांदा लावली अस बोलण्यात येते  या बिरुदावलीचे श्रेय काही जाणकार सुभाषचंद्र बोस यांनाही देतात , पण या बद्दल ठोस कागदी समकालीन लिखित पुरावा कोणीही देऊ शकलेले नव्हते !
प. जवाहरलाल नेहरू यांचे स्वीय सचिव एम. ओ. मथाई यांच्या 'Reminiscences Of The Nehru age  by M O Mathai '
या पुस्तकात माथाई यांनी राष्ट्रपिता हे स्तुतिवाचक शब्द सर्वप्रथम वापरले, असा स्पष्ट उल्लेख या पुस्तकात मथाई यांनी केला आहे. या सगळ्या वर आणखीन अभ्यास होणे गरजेचे आहे , मनातला संभ्रम दुर करण्या करीता....

पुण्यात सगळ्यात जास्त कशाची वाट बघितली जात असेल ? अस काही International committee ने Survey  केला तर उत्तर नक्कीच  "पुणे बस वाहतूक" हे  मिळेल 
दुख-र्या खांदयावर लटकणारी Sack , दिवस भर college  अन office मध्ये झालेली दगदग आणि घरी पाळण्याची हि संध्याकाळची
 वेळ ......
हवेत गारवा  असला तरी घामान शरीर डबडबलेल असतच ,त्यात पुण्यात नवीन असलेले पाहुणे इच्छित स्थळा विषयीचा मार्ग आणि बस नंबर साधारण ४० / ५० जनांकडून खात्री केलेली असली तरी भेदरलेले असतातच , बस येत नाही म्हणून आमची मुंबई अशी , आमची मुंबई तशी ! एका गोष्टी मुळ मुंबईच्या गुणांचा पाढा ओकणारे पुण्यात का येतात तेच नकळालेल गणित आहे .
अश्यातच एक आजोबा खांदयावर पत्रकारितेची bag  घेऊन  पायजमा आणि कुर्ता घातलेले , थकून भागून बस या " always late " विषयाची वाट बघत stop  झालेले होते.
बराच वेळ गेला .... 
कोणी तरी म्हंटल बस काय येत नाय ! 
कोण म्हंटल हे लक्षात न घेताच त्यांनी वाटेवर डोळे लावून धरलेली मान  नाकारणे हलवली ! सगळ्यांनी Public transport ऐवजी त्यांनी आता private company च्या बसचा पर्याय निवडला,
खर तर तो निवडण सगळ्यांनाच भाग होत ! , Stop वर आलेल्या नामांकित कंपनीच्या बस Driver ने दिलेल्या घोग-र्या आवाजात आपल्या इच्छित जागेच नाव आलेल बघून त्यांनी आपली bag  सांभाळून घेतली  आणि चढण घेण्यसाठी एक पाऊल पुढे टाकल , त्याच वेळी त्याच बस मध्ये चढण्याचा प्रयत्न साधारणपणे १३/१४ जन करत असावेत , तशी चढण ही आपल्या देशातील प्रवाशांची अंगवळणी पडलेली पद्धत आहे , मीच चढणार, माझा मान पहिला .....
सगळे बसले , " बसायला मिळाल बाबा " हे न बोलताच त्याच प्रत्येक्षिक अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघयला मिळत होता.
गाडी पुढ गेली , पुन्हा एका stop  वर थांबली  , driver ने आवाज दिला , नवीन प्रवासी चढले , गाडी आता भरून गेली !
एका अपरिचित रस्त्याने त्याने गाडी घेतली असावी , थंडीचे दिवस , दिवस लवकर मावळलेला , दुतर्फा झाडी आणि गाडी थांबली......................
शांततेलाही प्रश्न पडावा आणि पडलेल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामूळ मनात हलकल्लोळ माजावा अशीच ती परिस्थिती, मध्येच गाडी थांबली पण का ? त्याविषयी  कोणीच काही का बोलत नाही ? जागे वरून उठून कोणी का बरे पाहीले नाही ?
असे वेगवेगळे सवाल त्या आजोबांच्या मनात ऊभे झाले असावेत ! 
इतक्यातच driver च्या सीट वरून भारदस्त छातीचा , तगड्या उंचीचा एक बळकट बाका तरुण उडी मारून प्रवासी जागेवर आला , हात पसरवून तो काहीतरी बोलला , 
ते पाहून अचानक घशी आलेली उबळ आजोबांनी  घश्याच्या घाटीतच दाबली , ७०-८० दशक पाहिलेला त्यांचा काळ अचानक थांबण्यान गांगरून गेलेला होता . जिंदगीभर रापलेल्या ह्या इसमाच्या चेहऱ्यावरील नस अन नस शंकेने आणि अगणित प्रश्नांनी थरथरत होती ,
फसफसनारा त्यांचा श्वास त्यांचा त्यांनाच नकोसा झालेला होता , डोळे त्या म्हतार बुवांचे रक्त शिरांच्या जाळ्यांनी भरून गेले होते , 
 टपटपित घामाच्या थेंबांनी कपाळ भरून गेल होत आणि कानाच्या पाळी लाल रसरसीत झाली होती , हे सगळ बघून मीच त्यानकडे बघत म्हंटल " तिकीट काढतायेत ते तिकीट ! " 
पण त्यां पर्यंत तो आवाज गेलाच नाही , त्यांनी मनाची दारे बंद करून नजरेचच सगळ खर मानायचं ठरवल होत कदाचित ! 
पुन्ह्रउच्चार केल्या वर त्यांना जाणवलं , समाधानाचा निश्वास त्यांच्या नाक पाळ्यातून निसटला , मनस्थितीच्या निश्चिंतपणाच्या प्रवासाला त्यांची सुरुवात झाली .
                                     -------गौरव सुर्यकांत.सोनसळे 
९७६६७७४४६२ 
  



Newer Posts Older Posts Home
चला बोलूयात ..

फोटो वेडा, पुस्तक वेडा, इतिहास वेडा,
दुर्ग वेडा! जे हि करतो ते फक्त झपाटून करतो !
सविस्तर बोलूच नंतर ..

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी


आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी


येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

Webcounter


Stats Of Hits

POPULAR POSTS

  • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    संभाजीराजे राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस..... ...
  • काळे ढग....
    काळे ढग....  लांबलेल ऑफिसच timing संपल.... काळे ढग.... भरून आलेला पाऊस....... आणि मी....... जोराचा वाहता ठंड वारा आठचा आकड...
  • नारळ पाणी
    नारळ पाणी  संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला .. ...
  • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
    whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा ...
  • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
     ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ  भाग 1  ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ ...
  • रात्रीचा पिझ्झा !
    डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत ...
  • ती - तो आणि कॉलेज
     " ती अन तो   " ( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला ...
  • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू )  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्ण...
  • Sunday special मिसळ
                        Sunday special रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशा...
  • थर्मास ! (Thermos)
    त्या दिवशी लवकरच निघालेलो ऑफिस मधून... लवकर जायचं होत म्हणून जिन्या ऐवजी लिफ्टचा वापर करावा म्हंटल आणि बटण दाबलं सर्व्हिस लिफ्ट होती ती जि...

Writer’s soul

Writer’s soul
© Gaurav S.Sonsale. Powered by Blogger.

Advertisement

भेटूनच बोलुयात

नव्या जागा , नवी माणस, नव्या घटना, नवे विषय सारख्या खुणावत राहतील
शब्दबद्ध होता याव म्हणून नेहमी आशेने पाहतील

तेव्हा तेव्हा आपण भेटुयात
भेटूनच बोलुयात.....

Followers

Blog Archive

  • ►  2015 (6)
    • ►  August (3)
    • ►  October (1)
    • ►  November (2)
  • ▼  2016 (10)
    • ►  January (1)
      • नवीन शहरातला नवीन प्रवास
    • ►  February (1)
      • गांधी एक महात्मा , एक राष्ट्रपिता !
    • ►  March (3)
      • आनंद
      • Back to school
      • नारळ पाणी
    • ►  April (1)
      • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    • ►  July (2)
      • काळे ढग....
      • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
    • ▼  November (2)
      • रात्रीचा पिझ्झा !
      • भारतीय !
  • ►  2017 (1)
    • ►  March (1)

flickr

About Me

Unknown
View my complete profile

Popular Posts

  • संभाजीराजे आणि चिटणीस बखर
    संभाजीराजे राज्य व्यवस्थेला आणि लेखन व्यवस्थेला काळीमा फासण्याच काम इतिहासात अनेकांनी केले , त्याचे जनक हे मल्हार रामराव चिटणीस..... ...
  • काळे ढग....
    काळे ढग....  लांबलेल ऑफिसच timing संपल.... काळे ढग.... भरून आलेला पाऊस....... आणि मी....... जोराचा वाहता ठंड वारा आठचा आकड...
  • नारळ पाणी
    नारळ पाणी  संध्याकाळी येता येता पोटात कावळयांनी आंदोलन पुकारल म्हणून अण्णाभाऊ साठे नाटकगृहा बाहेर नाष्टयाचा बेत ठरला .. ...
  • किल्ले मल्हार गड ( Malhargad )
    whats  app वर रात्रभर भंकस करून सकाळी दिवस तसा उशिराच सुरु झाला , आळशावलेल  तोंड घेऊन बिछान्या लगत असलेला mobile उचलला आणि  पुन्हा ...
  • ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ
     ॐ ॥ श्री क्षेत्र तुळजापूर ॥ ॐ  भाग 1  ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते  ॐ ...
  • रात्रीचा पिझ्झा !
    डाव्या पायाने side स्टॅन्ड लावत त्याने गाडी पार्क केली , डोक्यावरच लाल हेल्मेट उजव्या आरशावर अडकावत , डावा हात कंबरेला लटकवलेल्या पिशवीत ...
  • ती - तो आणि कॉलेज
     " ती अन तो   " ( मी कॉलेजमध्ये असताना मी लिहलेला जुना लेख , कॉलेजच्या  " मंथन " वार्षिक अहवालात छापून आलेला ...
  • खिद्रापूर मधले कोपेश्वर !
    खिद्रापूर मधले कोपेश्वर ( भगवान शिव आणि विष्णू )  कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील एक गाव आहे  " खिद्रापूर"  कृष्ण...
  • Sunday special मिसळ
                        Sunday special रेंगाळलेली रविवारची सकाळ रविवारच्या सवई प्रमाणेच उशिरा आली होती अदल्या दिवसी रात्रि जेवतानाच नेमकं विशा...
  • थर्मास ! (Thermos)
    त्या दिवशी लवकरच निघालेलो ऑफिस मधून... लवकर जायचं होत म्हणून जिन्या ऐवजी लिफ्टचा वापर करावा म्हंटल आणि बटण दाबलं सर्व्हिस लिफ्ट होती ती जि...

Copyright © 2016 चला बोलूयात... Created by गौरव सुर्यकांत.सोनसळे | Distributed By गौ.सु